मागे
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना ।। धृ ।।
चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या ।
बोरी बिघडल्या त्या चंदनमय झाल्या ।। १ ।।
सागराच्या संगे नदी बिघडली ।
नदी बिघडली ती सागरमय झाली ।। २ ।।
परिसाच्या संगे लोह बिघडले ।
लोह बिघडले ते परिसमय झाले ।। ३ ।।
विठोबाच्या संगे तुका बिघडला ।
तुका बिघडला विठ्ठलमय झाला ।। ४ ।।
साईबाबा संगे आम्ही बिघडलो ।
आम्ही बिघडलो ते साईमय झालो ।। ५ ।।
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना ।। धृ ।।
चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या ।
बोरी बिघडल्या त्या चंदनमय झाल्या ।। १ ।।
सागराच्या संगे नदी बिघडली ।
नदी बिघडली ती सागरमय झाली ।। २ ।।
परिसाच्या संगे लोह बिघडले ।
लोह बिघडले ते परिसमय झाले ।। ३ ।।
विठोबाच्या संगे तुका बिघडला ।
तुका बिघडला विठ्ठलमय झाला ।। ४ ।।
साईबाबा संगे आम्ही बिघडलो ।
आम्ही बिघडलो ते साईमय झालो ।। ५ ।।
संत लिखित अभंग आहेत त्यात कृपा करून बदल करु नका
ReplyDeleteबदल करू नका. संत तुकाराम महाराजाची ही अमृतवाणी आहे. साईबाबा विषय कमालीचा आदर आहे तरीही त्यांच्यासाठी स्वातंत्र्य अंभग लिहता येईल. पण संत तुकारामांच्या अंभगात अशी सरमिसळ नको. असं विनम्रभाव ठेवून सांगाव वाटतं.
ReplyDelete🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteजय
ReplyDelete